Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Sunday, May 31, 2015

1 शायरीचा गुलदस्ता भाग 11


उर्दू शायरी मध्ये 'चिराग' शब्दाचा प्रयोग अनेकदा केलेला आपणाला आढळतो. चिराग या शब्दाचा अर्थ 'दिवा' असा होतो.परंतु चिराग हा शब्द वेगवेगळ्या संकेताने अनेक वेळा वापरलेला दिसतो. असाच एक शेर पहा,

शहर के अंधेरे को इक चिराग काफी है.
सौ  चराग जलते है इक चराग जलनेसे.                         अज्ञात

समाजात जो अंधार पसरलेला आहे, ज्या कुप्रथा रूढ झालेल्या आहेत त्या दूर करण्यासाठी एका दिव्याची गरज असते. येथे 'चिराग' हा शब्द आदर्श, सभ्य, संस्कारी माणसाच प्रतिक आहे. एक झिजस, एक राम, एक महात्मा गांधी, एक सावरकर, एक भगत सिंग, एक टिळक,  एक बाबासाहेब आंबेडकर, हजारो लाखो लोकांना जागृत करतात. अन्याया विरुद्ध जुलमी राजवटी विरुद्ध, उठाव करण्यास प्रवृत्त करतात.  अशी एकच व्यक्ती समाजातील  अंधकार दूर करण्यास समर्थ असते कारण तोच दिवा हजारो दिव्यांना प्रज्वलित करतो म्हणजेच एक व्यक्ती हजारो लाखो लोकांना कार्य सिद्धीस नेण्यास प्रवृत्त करत असते.

हथेलियोने  बचाया बहुत चरागों को,
मगर हवा भी अजब जाविए बदलती है.                           अज्ञात

जाविए : कोण, angles

जेव्हा हवा सुरु होते तेव्हा दिवा विझु नए म्हणून आपण त्या दिव्याला हाताने झाकतो. येथे 'चराग' म्हणजे एखादा उत्कट विचार, संस्कार, प्रथा, किव्वा सभ्यता. 'हथेली' हे सभ्य माणसाच प्रतिक. म्हणजेच सभ्य माणसांनी हे संस्कार, ही सभ्यता समाजात  टिकून राहण्यासाठी कसोशिने प्रयत्न केलेत. परंतु "हवा भी अजब जाविये बदलती है."   परंतु जुलुमी हवा वेगवेगळ्या दिशेने या दिव्यावर आक्रमण करून हा दिवा विझवण्याचा प्रयत्न करत असते.

दत्तात्रय पटवर्धन

Wednesday, May 13, 2015

0 बुद्धिबळाचा इतिहास : भाग ७

पर्शिया मध्ये या खेळात काही बदल करण्यात आलेत. आपणाकडे जो 'गज' होता तो पाच घरात चालत असे.
एक समोरील घरात, हे सोंडेचे प्रतिक होते. आणि एक घर कर्ण रेषेत, अशी चार घरं, जी चार पायांचे प्रतिक होते.
परंतु पर्शिअन सैन्यात गज म्हणजेच हत्ती चे महत्व नव्हते म्हणून त्यांनी गज ( bishop ) चे समोरील घरात
जाणे बंद केले व त्या ऐवजी कर्ण रेषेत एका ऐवजी दोन खरात जाण्याचे बळ दिले. पर्शिअत या खेळावर
भारतापेक्षा  जास्त विचार करण्यात आला तसाच त्यांनी एक महत्वाचा बदल केला तो हा कि जर राजावर जोर
असेल तर "शाह" म्हणून घोषणा करायची. हाच शब्दप्रयोग आपण सध्या 'शह' म्हणून उदगारतो. हीच घोषणा
पुढे इंग्रजीत 'चेक' म्हणून प्रचारात आली. अशी घोषणा करण्या मगच उद्देश हा कि शत्रुपक्षाला सचेत करणे कि
तुझा राजा धोक्यात आहे जेणे करून त्याचे लक्ष नसेल तर राजा मरेल आणि डाव आकस्मित पणे संपेल.पुढे
'check  mate ' सारखे शब्द प्रयोगात आले.

जेव्हा राजा कोणत्याही घरात सरकू शकत नाही,म्हणजेच असे कोणतेही घर राजा साठी उपलब्ध नसते जेथे
ते घर शत्रू पक्षाच्या जोराविना आहे. अशा परिस्थितीस पर्शिअन लोकं 'मानद'असे महानत. याचा अर्थ गोंधळलेला यातूनच पुढे 'mate ' हा शब्द प्रचारात आला. म्हणूनच 'mate ' चा अर्थे 'राजा मेला' असा न होता 'गोंधळलेला राजा' असा होतो.

पर्शिआत 'चतुरंग' चा 'झतरंग' असा अपभ्रंश झाला. राजाचे नामकरण 'शाह' म्हणून करण्यात आले. चातुरांगातला 'मंत्री' हा 'फर्झीन' झाला . घोडा अस्प , बिशप (elephant ) पिल तर foot soldier हा पियादा म्हणून नावारूपास आला. फर्झीन या
शब्दाचा उपयोग संत कबीर तसेच संत रहिम यांच्याही डोह्यांत सापडतो,
उदा. बडा बढाई न करे, छोटा बहु इतराय
        ज्यो प्यादया फरझी भया , तेढा तेढा जाय || ( कबीर )

रहिमान सिधी चाल सो प्यादा होत वजीर
फरजी साह न हुई सके, गती तेढी तासीर. || ( रहीम )

Monday, May 4, 2015

0 शायरीचा गुलदस्ता भाग १०.

निदा फाजली, एक चालत बोलत अंजुमन ,   यांची हि गज़ल आहे. 
प्रत्येक गज़ल हि काहीना काही आशय  घेऊन येते. प्रत्येक शेर वेगवगळ्या विषयाशी ओळख करून देतो.
गजल वाचल्यावर प्रत्येकाला असे वाटते की गजल ही त्याच्या  साठीच लिहिलेली आहे.

कही छत थी, दिवारो-दर थे कही, मिला मुझको घर का पता देरसे,
दिया तो बहुत जिन्दगिने मुझे, मगर जो दिया वो दिया देरसे.

घराच छत  कुठे तर दरवाजे-भिंती कुठे भलतीकडेच असल्यामुळे मला, माझ आपलं पूर्ण  घर मिळायला उशीर झाला.
तस पाहिलं तर मला या जीवनात खूप काही मिळाल. प्रत्येकाला मिळत असतं. परंतु मला उशिरा मिळाल .
वेळ निघून गेली होती आता त्या मिळालेल्याची काहीच किंमत माझ्या जीवनात नव्हती,
 त्याची आवश्यक्यता हि नव्हती.

हुवा न कोई काम मामुलसे, गुजरे शबोरोज कुछ इस तरह
कभी चांद चमका गलत वक्तपर, कभी घरमें सुरज उगा देरसे.

काय कहाणी सांगू जीवनाची? प्रत्येक कामात अडचणी. कोणतच  काम सहजतेने झाले नाही.
आयुष्यातील दिवस रात्र (शबोरोज) असे गेले कि कधीच वेळेवर चंद्र उगवला नाही तर
सूर्य नेहमीच उशिरा उगवला.

ये इत्तेफ़ाक़त  का खेल है, यही है जुदाई, यही मेल है,
मै मुडमुडके देखा किया दूर तक, बनी वो खामोशी, सदा देरसे |

जीवनात घडणार्या गोष्टी या योगायोगाच्या असतात. मग एखाद्याची भेट काय आणि ताटातूट काय?
परंतु मी मागे वळून वळून क्षितिजा पर्यंत पाहत राहिलो कि कोणीतरी साद ( आवाज ) देईल. आम्हाला बोलावेल.
परंतु दर वेळेला एक भीषण शांतताच नजरेस पडली. आणि आसाच एक दिवस आवाज आला परंतु त्यावेळेस
उशीर झालेला होता.

कही रुक गये राह में बेसबब, कही वक्तसे पहले घर आई शब,
हुए बंद दरवाजे खुलखुलके सब, जहा भी गया मै - गया देरसे. |

आता या सर्वासाठी केव्हा केव्हा माझीच चूक होती ना. कारण नसताना आम्ही रस्त्यात थांबलो, तर कधी निघायच्या  वेळीच
अंधारून आलं. अनेक दरवाजे माझ्या साठी उघडले गेले, आणि बंद झाले. कारण मी प्रत्येक ठिकाणी उशीराच  पोहोचलो.

सजा दिनभि रोशन, हुई रातभी, भरे जाम, लहरी बरसात भी,
रहे साथ कुछ ऐसे हालत भी , जो होना था जल्दी हुआ देरसे ]

अस नाही कि आमच्या जीवनात बहार हि कधीच आली नाही. चमचमती रात्र कधीच आली नाही. पावसाळ्याचा आनंदही लुटला नाही, प्याले भरभरून रिकामे  झाले नाहीत. अस कही नाही. हे सर्व कही झाल, परंतु अशा वेळी झाल कि ज्या वेळी व्हायला हव होतं तेव्हा झाल नाही. .


दत्तात्रय पटवर्धन