Comments

अभिव्यक्ती इंडिया या संकेत स्थळावर आपले सहर्ष स्वागत.

Monday, February 1, 2016

0 येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर



येवढा विश्वास नाही राहिला तो माणसावर 
भिंत तोडोनी म्हणे, करु या जगा शमशान सारे I

काय झाले मानवासी मानवाचा घात करतो
तो इराणी, तो इराकी, जीव घेण्या एक सारे I 

धर्म येथे आड ना ये, रंग असो कोणताही
संस्कृतीचे भान नाही, रक्त वाहो रोज सारे I

मानवाचे शौर्य सारे, एकमेकां मारणेसी
या जगाचे एक थडगेची कराया बध्द सारे I 

पाक यांची नीत कैसी, मारती भूके जनांना 
राख करणे, ध्वस्त करणे, पाकड्यांचे खेळ सारे I 

योजना कैसी तुझी आहे मला ते आकळेना 
जोडणे नाही कुठेची, तोडण्याती मग्न सारे I




        - प्रकाश पटवर्धन
        १९४२०१५  

No comments: